07 February 2022
Yawn
By Vaidya Harish Patankar268 119 0
1. जांभळ्या जास्त येत असल्यास काय करावे?
उत्तर- जांभळी येणे हे लक्षण साधारण माणसाला निद्रा वेग येण्यापूर्वी किंवा शरीर व मन थकले की सुरू होते. बऱ्याचदा पुढचा व्यक्ती जांभळी देऊ लागला की अन्य लोक पण जांभळी देऊ लागतात. कारण थकवा , आळस आला असल्यास आपलं मन आपल्यालाही विश्रांती घेण्याचा सल्ला देत व तशी कृती पुढे दिसली की तेच करण्याचा प्रयत्न करत. अश्या वेळी खरच थकवा आला असेल व महत्वाचे काम नसेल तर सरळ विश्रांती घ्यावी. प्रवास करताना, गाडी चालवताना याची विशेष नोंद घ्यावी. अन्यथा लवंग, वेलची चघळणे, चहा घेणे, एका जागेवरून उठून पाणी पिणे, चेहरा धुणे असे साधे सोपे उपचार करून जांभळी घालवावीमात्र याकडे दुर्लक्ष करू नये.
Comments
No Comments
Latest Posts
-
Urine......
( 2 years ago) -
Vaman, Virechan......
( 2 years ago)