07 March 2022
Fig
By Vaidya Harish Patankar378 111 0
1. अंजीर खाण्याचे काय फायदे होतात? कोणी कोणी ते खावे?
उत्तर- अंजीर हे पित्तशामक व रक्तवृद्धी करणारे आहे. अशक्त लोकांनी रोज सकाळी याचे सेवन केल्यास अंजिराच्या अंगी असणाऱ्या रक्तवृद्धी व रक्तशुद्धी च्या गुणधर्मामुळे त्यांचा अशक्तपणा लवकर दूर होतो. अंजिराच्या कच्च्या फळांची भाजी करतात ती जास्त रुचकर नसली तरी बाधक ही नाहीये. पिकलेल्या फळांचा मुरंबा करतात तोही बल्य व रक्तवर्धक आहे. शिशिर ऋतूमध्ये थंडीच्या योगाने जेंव्हा जीभ व तोंड ही फुटतात तेंव्हा अंजिराच्या पानांची राख ओठांना घासली जाते. उत्तम फायदा होतो. अंजीर शीतल स्वादु व गुरू आहेत. याने रक्तदोष , दाह, वायु व पित्त शमन ही होते. सुके अंजीर सुद्धा उत्तम पोषक आहेत, पचनशक्ती उत्तम असल्यास रोज एक किंवा दोन सेवन करायला हरकत नाही.
Comments
No Comments
Latest Posts
-
Urine......
( 2 years ago) -
Vaman, Virechan......
( 2 years ago)