Smrutiayurved's Blog

Toor Daal

06 May 2022 
Vaidya Harish Patankar    
347   139   0

आजकाल तूरडाळ सेवन वाढले आहे, पित्ताचा त्रास होत आहे, तूरडाळ खाल्ल्यास पित्त वाढते का?

उत्तर- हो. लाल टरफलाची तूर डाळ अवष्टंभ करणारी, पित्त वाढविणारी असते. तिचे जास्त सेवन करू नये, पित्त प्रकृतीच्या लोकांनीही तिचे ज्यादा सेवन करू नये. पूर्वी चढलेली भांग उतरविण्यासाठी तुरीची डाळ वाटून पाणी घालून प्यायला देत असत. तुरीचे मूळ सुद्धा चावून खायला दिल्यास सापाचे विष उतरते असा एक पूर्वीचा उपचार आहे. तूर कडधान्यांमध्ये अग्रभागी आहे, हिचे लाल व सफेद अश्या दोन जाती आहेत. एकूणच भारतात तुरीचे सेवन......

Read More →

Leech

30 Apr 2022 
Vaidya Harish Patankar    
396   116   0

त्वचारोगामध्ये जळवा लावल्याचा फायदा होतो का??

जळवा म्हणजेच जलौका ही आयुर्वेदातील खूप विस्तृत व उत्कृष्ट चिकित्सापद्धती आहे. जळवा लावून रक्त काढण्याला रक्तमोक्षण असे म्हणतात. त्वचारोग मुख्यतः आहार व विहार याच्या माध्यमातून झालेल्या दूषित रक्त धातूमुळे होतात. जलौका हेच अशुद्ध रक्त शरीराबाहेर खेचून घेतात. ज्यामुळे त्वचा रोगांमधील लालसरपणा, खाज, पुयस्त्राव या गोष्टी कमी व्हायला मदत होते. त्वचारोग पसरत जाऊ नये म्हणून विसर्पासारख्या व्याधींमध्ये जळू चा खूप उपयोग होतो. जळू ही त्वचारोगांम......

Read More →

Burp, Vometing - Ayurved Perspective

30 Apr 2022 
Vaidya Harish Patankar    
272   117   0

1. सतत खूप ढेकर येतात, काय उपाय करावा?

उत्तर- सतत ढेकर येणे हा एक पचनशक्ती बिघडल्याचा आजार आहे. कित्त्येक रुग्णांना तर हात , पाय दाबले, गर्दीत गेले अंग दाबले गेले तरी ढेकर येतात. कदाचित मांसगत वात सारखी लक्षणे पण त्यांना असू शकतात. योग्य निदान करून उपचार घ्यावेत. साधारण भाजलेला हिंग व कोमट पाणी किंवा शेवग्याच्या मुळांच्या रसात दोन चिमूट भाजलेला हिंग टाकून दिल्यासही ढेकर कमी होतात. दिवसभर कोमट पाणी पिणे, थोडं उपवास करणे व रात्री झोपताना गंधर्व हरितकी किंवा एरंडेल तेल पिणे, मूग भात खिच......

Read More →

Dry Fruits

29 Apr 2022 
Vaidya Harish Patankar    
232   102   0

1. सुकामेवा म्हणून पिस्ता खाल्ला जातो, त्याचे प्रमाण रोज किती असावे व त्याचा काय फायदा होतो?

उत्तर- पिस्ते मधुर व स्वादिष्ट लागतात. ते बलदायक व पुष्टीकारक असतात. पिस्त्याचे तेल डोक्याला चोळल्यास पित्त शमन होते. केश्य कार्य घडते. पिस्ते पचायला जड असतात त्यामुळे त्याचे अधिक प्रमाणात सेवन करू नये. ते वीर्यवर्धक, रक्त शुद्धी करणारे, पित्ताला भेदक व मलाला सारक आहेत. त्रिदोष नाशक आहेत. तूप व पिस्ते गाईच्या दुधासह सेवन केल्यास मेंदू ची दुर्बलता नाहीशी होते, स्मरणशक्ती सुधारते. शिवाय वीर्य व......

Read More →